महाराष्ट्रातील मुख्य शहरे: Difference between revisions
From Citypedia Online
No edit summary |
No edit summary |
||
| Line 24: | Line 24: | ||
* '''[[कल्याण डोंबिवली]]''' | * '''[[कल्याण डोंबिवली]]''' | ||
* '''[[नवी मुंबई]]''' | * '''[[नवी मुंबई]]''' | ||
[[Category:सिटिपीडिया]] | [[Category:सिटिपीडिया]] | ||
{{Template:Edit}} | {{Template:Edit}} | ||
Revision as of 11:26, 11 January 2026
- मुंबई - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारताच्या सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने भारताच्या विविध भागांतून लोक रोजगारासाठी येथे मोठ्या संख्येने येतात.
- पुणे - शिवाजीपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. शिक्षण आणि संशोधनसंस्था येथे मोठ्या संख्येने आहेत. पुणे शहर परिसरात आधुनिक उद्योगव्यवसाय मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या आघाडीचे शहर असा लौकिक पुण्याने मिळवला आहे.
- नागपूर - विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.
- छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असा लौकिक असलेल्या या शहरात आणि परिसरात अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. मुंबई उच्च न्यायालयचे खंडपीठ येथे आहे. वाहनांचे सुटे भाग आणि पेयनिर्मितीच्या कारखान्यांची संख्या छ्त्रपती संभाजीनगर परिसरात मोठी आहे. मराठवाडा विभागाचे मुख्यालय छ्त्रपती संभाजीनगर येथे आहे.
- नाशिक - हे उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक व औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या मुहूर्तावर गोदावरी नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते. त्यासाठी हिंदू साधू आणि भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.
- कोल्हापूर - शिवाजीच्या काळापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. त्याच बरोबर येथे शिवाजी विद्यापीठ आहे.
- सोलापूर - महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील एक प्रमुख शहर. एके काळी कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. येथील सिद्धेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध.
- अमरावती - एक प्रमुख शहर. एके काळी कापूस उत्पादनात प्रसिद्ध होते. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे गांव. आधुनिक संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जिल्हा म्हणुन ओळख.
- सातारा - मराठी साम्राजाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणारे शहर. या शहरात इतिहासाच्या पाऊलखुणा प्रखरतेने जानवतात. याच जिल्ह्यातील सर्वाधिक तरुण भारतीय लष्करात दाखल होतात म्हणुन साताऱ्यास सैनिकांचा जिल्हा म्हणूनही ओळखले जाते. सातारचा कंदी पेढा प्रसिद्ध
- नांदेड - नांदेड हे गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. येथे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचे उप मुख्यालय आहे. येथेच शीख धर्मीयांचे दहावे गुरू श्री गोविंदसिंग यांची समाधी (गुरुद्वारा) आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथेच आहे.
- ठाणे - मुंबईच्या उत्तरेस वसलेले तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले ठाणे हे ऐतिहासिक प्रमुख शहर आहे. आशिया खंडातील पहिली रेल्वे धावलेल्या शहराचा मान असून महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्ह्याचा मान देखील ठाण्याला आहे.
- पिंपरी-चिंचवड - पुण्याच्या उत्तरेस वसलेले आणि श्रीमन महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले पिंपरी-चिंचवड हे शहर उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. येथे अनेक देशाविदेशातील कंपन्या, कारखाने स्थापन झालेले आहेत. या शहराला उद्याननगरी असेही संबोधले जाते. तसेच याच शहरात सर्वाधिक उड्डाणपूल बांधलेले आहेत. प्रसिद्ध क्रांतिकारक चापेकर बंधू पिंपरी-चिंचवड शहरातीलच होते. शहराच्या मध्यभागी श्रीमन महासाधू मोरया गोसावी यांचे समाधी मंदिर वसलेले आहे.
